मुळात त्यांच्या स्वत:च्या संकेतस्थळावरच हे काव्य गीत म्हणून प्रकाशित झालेले आहे.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
सर्व शेरात बेसिकली एकच प्रश्न किंवा मुद्दा आहे. ( गझलेत एक विषय असू शकतो, जसे प्रेम, विरह, निराशा वगैरे! पण मुद्दा ( किंवा पॉईंट ) किंवा विविध मार्गांनी तेच बोलणे नसते. म्हणजे:
जर प्रेयसीला विरह जाणवत असेल्:
तर ती सर्व शेर विरहावर करेलही. पण त्यात 'अनप्रेडिक्टॅबिलिटी', 'काव्य असणे' ( म्हणजे सपाट बातमी किंवा विधान नसणे ), उपमा, भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी इतर उदाहरणे देणे वगैरे गोष्टी जाणीवपुर्वक येतील. खरे तर त्या नैसर्गीक पद्धतीनेच येतील. म्हणजे तेवढी तीव्रता मुळातच असेल.
वरील गीतात तसे नाही. विविध मार्गांनी एकच गोष्ट विचारली गेली आहे. अर्थात, ज्या कवीने पुढच्या अनेक कवींच्या पिढ्या निर्माण केल्या व स्वत:साठी मराठी काव्याच्या इतिहासात एक ध्रूवपद निर्माण केले त्या कवीवर काही भाष्य करणे हे माझ्या कुवतीबाहेरचेच आहे असे नाही तर मी ते कधी करू इच्छिणारही नाही. परंतू, जो सदर रचनेबद्दल विषय चालला आहे त्यावर माझे हे स्पष्ट मत आहे.
-
गझल म्हणजे फक्त तंत्र नव्हे!>> हे पुर्णपणे मान्य आहे. पण तंत्र नसेल तर ती गझल नाही हे ही तितकेच खरे आहे.
नव्याने गझल लिहू इच्छीणार्या माझ्यासारख्या लोकांना प्रथम गझलेचे तंत्र आत्मसात करून त्यावर पकड मिळवणे आवश्यक आहे. ती पहिली पायरी आहे असे मला वाटते.
बाकी गझलेचा मंत्र अभ्यास करून आत्मसात करता येइल का? की ती एक दैवी देणगी आहे हे प्रश्न आहेतच. बाराखडीत भटांनी गझल व कवितेमधले मंत्राच्या दृष्टीने काही ठळक फरक दिले आहेत. सुरुवातीला निदान ते फरक रचनेत दिसतात का हे पाहणे ही दुसरी पायरी. मग पुढे जाऊन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'अनप्रेडिक्टॅबिलिटी', 'काव्य असणे' ( म्हणजे सपाट बातमी किंवा विधान नसणे ), उपमा, भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी इतर उदाहरणे देणे, आशयाचा अंदाज काफिया येईपर्यंत बांधता न येणे हे सगळे येईल असे मला वाटते.
आपले म्हणणे अगदी खरे आहे. मुळात तंत्र नसेल तर ते काव्य गझल होणारच नाही.
एक द्विपदी दुसर्या द्विपदीवर आशयासाठी विसंबून नसणे हे गझलेच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जे गझलेला कवितेपासून वेगळे करण्यात एक महत्वाचा वाटा उचलते.
गझलमंत्र - ही गोष्ट अभ्यास करण्याची खरे तर नाहीच असे माझे तरी मत आहे. तसे असते तर बरेच कवी तंत्र व मंत्र शिकून गझलकार होऊ शकले असते. ( थोडा मीही तसाच आहे. हा हा.) गझलेच्या शेराचा आशय मनात निर्माण होणे ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे.
उदाहरण - निसर्गरम्य द्रुश्य पाहून एखाद्याला त्या निसर्गाच्या वर्णनाचीच कविता करावीशी वाटू शकेल. पण एखाद्या गझलकाराला ती रम्यता क्षणिक आहे असे वाटणे / प्रेयसी भेटल्यावर होणार्या मनस्थितीसारखी आहे असे वाटणे / जगाच्या फसव्या प्रव्रुत्तीसारखी आहे असे वाटणे / ती रम्यता निर्माण होण्याआधी निसर्गात काय काय घडले होते याची जाण येणे ( काय त्याग केल्यावर काय लाभते वगैरे ) / जुना जमाना कसा होता याची आठवण येणे यातील काहीतरी होईल. भटसाहेबांचा एक शेर 'गझल' व 'कविता' यांच्यातील निर्मीतीमागची प्रक्रिया कशी भिन्न असते हे दाखवण्यासाठी उत्तम आहे:
यौवनात पदार्पण करणार्या प्रेयसीला पाहून कवी देहभान विसरला व जगात काय चालले आहे त्याबाबतीत पूर्णपणे अजाण राहिला.
फुलायला लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते
आता हा शेर गझलेचा का म्हणायचा? -
1. तो रचनेतील इतर द्विपदींवर आशयासाठी अवलंबून नाही.
2. तो गझलेचे तंत्र पाळतो. ( खरे तर हा मुद्दा क्रमांक एक पाहिजे. )
3. ते प्रेयसीच्या यौवनात पदार्पण करण्याचे सवंग वर्णन नाही. म्हणजे दुसर्या एखाद्या कवीने ती यौवनात येताना कशी फुलायला लागली याचे इथ्यंभूत वर्णन केले असते. पण या शेरात तिच्या त्या बदलांमुळे कवीवर काय परिणाम झाला याचे वर्णन आहे. म्हणजेच ही एक अनुभुती झाली. यात एका अनुभवाचे, एका घटनेचे वर्णन आहे. गझलेमधे अनुभुती व अनुभुतीचा सच्चेपणा ( किंवा परकायाप्रवेश ) अत्यंत महत्वाचा आहे. निसर्ग छान दिसत होता, ती फार सुंदर दिसते, राजकारणी नालायक आहेत वगैरे बातम्या आहेत. त्यातून कवीच्या मनस्थितीवर होणारा परिणाम कवीने मांडणे हा गझलेतील व कवितेतील अनेक फरकांमधील एक फरक आहे.
4. व्यथा - गझलेमधे व्यथेच्या उपस्थितीला बरेच महत्व असावे असे अनेक गझला वाचल्यावर जाणवावे. वरील शेरात कुठे व्यथा आहे असा प्रश्न कदाचित पडेलही! पण आहे! मी तुझ्यावर प्रेम करण्यात सारा वेळ घालवला, पण मला त्याचा काय फायदा झाला? उलट माझ्या बाबतीत किंवा नशिबात आलेले चांगले क्षण सुद्धा मी तुझ्यामुळे दुर्लक्षित ठेवले. अशी ती व्यथा!
5. एक ओळ दुसर्या ओळीच्या तुलनेत - गझलेमधील व कवितेतील आणखीन एक फरक असा म्हणायला हरकत नाही की गझलेमधील एका ओळीचा दुसर्या ओळीशी संबंध तर असतोच पण बहुतेकवेळा दुसर्या ओळीत पहिल्या ओळीला 'कलाटणी मिळणे', 'अचाट रीतीने अंत होणे' ,'तीव्रता अती वाढणे' यातील काहीही किंवा काहीतरी अधिक होते. कवितेमधे असे होतही असेल, पण व्हायलाच पाहिजे असे कवितेकडून अपेक्षित करता येत नाही. गझलेकडून मात्र काहीतरी जबरदस्त अपेक्षा ठेवली जाते. ( याबाबतीत मात्र सदर शेर कसा आहे हे मला ठरवता येत नाही. ) पण अर्थातच ही फक्त एक अपेक्षा आहे. ती एकच अपेक्षा नाहीये जी पूर्ण व्हायलाच पाहिजे.
फार चांगल्या रितीने मुद्दे मांडले आहेत तुम्ही. मला नसते जमले. :-)
एक द्विपदी दुसर्या द्विपदीवर आशयासाठी विसंबून नसणे हे गझलेच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. >> मला वाटते हा मुद्दा तंत्रासोबतच मंत्राचाही भाग असावा. लांबड न लावता दोन ओळीत पुर्ण आशय व्यक्त करण्यासाठी नुसते तंत्र अवगत असणे पुरेसे नसावे.
तुम्ही म्हणता तसा मुद्दा क्र. 5 ही फक्त अपेक्षा असते. मला वाटते सौंदर्य ही मुळ अपेक्षा आहे. कलाटणी, तीव्रता ह्या अंगामुळे शेराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. विशेषत: हे दोन ओळींत होत असल्याने गझलेमधे हे जास्त बघायला मिळत असावे असे वाटते. वैभव जोशी ह्यांच्या नेमस्त ह्या कवितेतील दोन ओळी आठवल्या:
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते..
कवितेच्या असल्या तरी ह्या ओळी वरील सर्व निकषांवर खर्या उतरू शकतात.
अजून एक मुद्दा म्हणजे प्रत्येक शेराचा वाचकाला लागणारा अर्थ. हा पुर्णत: वाचकांच्या अनुभवविश्वावर अवलंबून असतो. "फुलावया लागलीस..." ह्या शेरात तुम्ही यौवनात पदार्पण करणार्या प्रेयसीचा उल्लेख केला आहे. मला हा शेर भटांनी स्वत:च्या गझलेला उद्देशून लिहिला आहे असे नेहमीच वाटत आले आहे. (त्यांच्या इतर रचनांमधेही 'येणार्या पिढ्यां'बद्दल बरेच शेर आहेत.) फरक (प्रेयसी, गझल) फार सुक्ष्म असला तरी अर्थाचा एक वेगळा पैलू समोर येतो. व्यक्ति तितक्या प्रकृती हे जरी खरे असले तरीही माझ्या मते किमान एक अर्थ वाचकांपर्यंत पोहचत असेल तर तो यशस्वी शेर आहे. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे दुर्बोधता सापेक्ष असली तरी सुबोधता हा दुर्गुण होऊ शकत नाही. कदाचित म्हणूनच भटांनीसुद्धा "बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा" असे म्हटले असावे.
मला ते दोन् विशिष्ट विचार कायम ठासावासे वाटतात व आवडतातही. आपणही नेमका तेच मांडलेत.
( एकंदर आपले जमेल असे वाटत आहे. )
1) दुर्बोधता सापेक्ष असली तरी सुबोधता हा दुर्गूण नाही.
2) निदान एक अर्थ तरी रसिका/वाचका/श्रोत्यापर्यंत पोचलाच पाहिजे. बाकी त्यांच्या अनुभवविश्वानुसार ते काढतील तो अर्थ निराळाच!
मला तर असेही म्हणावेसे वाटते की 'जो एक अर्थ रसिकापर्यंत पोचलाच पाहिजे' तो अर्थ कवीला 'अभिप्रेत असलेला' अर्थही असावा. म्हणजे मला जे म्हणायचे आहे ते तसेच मुळात वाटू शकणे, शब्दार्थ एक अन भावार्थ वेगळा असणे हे रसिकाने जाणू शकणे व रसिकाला हवा तो एक नवीन अर्थही निघणे हे यशस्वी कवितेचे एक चिन्ह म्हणायला हरकत नसावी.
उदाहरणार्थ -
वैभव जोशी यांचाच एक मला अतिशय आवडलेला शेर देत आहे:
असे लांबून बघण्याने खरी ओळख कुठे पटते?
उद्या माझ्या ठिकाणी वेगळा तारा असू शकतो
वैभव यांना काय अभिप्रेत असावे असा अंदाजही रसिकाला येऊ शकतो तसेच आपापल्या अनुभवविश्वाप्रमाणे रसिकाला एक स्वत:चा असा वेगळा अर्थही प्राप्त करून घेता येतो.
गझलेचे शेर असे सार्वकालीन व सर्वसमावेशक असले की फार मजा येते.
( उघड आहे: वरील शेर कुठल्याही काळातील माणसाला स्वत:ला आयडेंटिफाय करणारा वाटणे सहज शक्य आहे. )
सर्व शेरात बेसिकली एकच प्रश्न किंवा मुद्दा आहे.- This is right.
How about calling this a musalsil ghazal?
Majority of the ghazals written in urdu are ghair-musalsil. Therefore, it is believed that a ghazal has to be ghair-musalsil and every sher must be independent of the other and usually having a different theme and thought. I personally feel that it is indeed the speciality of ghazal and adds to its beauty. However, if a ghazal has common theme in all the shers but is following the grammatical laws of ghazal, why not call it a musalsil ghazal rather than nazm?
Will appreciate confirmation/ comments from pundits here.
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
गझलच...
ही गझलच आहे!
- नचिकेत आठवले
गझलच...
ही गझलच आहे.
- विनोद इन्गळे
prati sad
HO Y hi pharjuni jazal aahe . hi gazal shuresh Bhat yanchi aahe.
& ya gazlecha vapar 1 ka Marathi chitrapatat kela gela aahe.
This is a ghazal with rhymes in each section of sher...
B E A U Tiful ghazal.......Hats off to Sureshji.
अविनाश महाले
प्रथम
प्रथम मला गझल आणी गीत या मधील फरक सागालकाय.....
गजलेची बाराखडी
http://www.marathigazal.com/node/9.. या ठिकाणी तुम्हाला गजलेबद्दल माहिती मिळेल.
माझ्यामते अयोग्य आहे.
गझलेची बाराखडी वाचून एखादा काव्यप्रकार गझल आहे की नाही हे ठरवणे असंयुक्तिक आहे.
गझल म्हणजे फक्त तंत्र नव्हे!
गीत
मुळात त्यांच्या स्वत:च्या संकेतस्थळावरच हे काव्य गीत म्हणून प्रकाशित झालेले आहे.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
सर्व शेरात बेसिकली एकच प्रश्न किंवा मुद्दा आहे. ( गझलेत एक विषय असू शकतो, जसे प्रेम, विरह, निराशा वगैरे! पण मुद्दा ( किंवा पॉईंट ) किंवा विविध मार्गांनी तेच बोलणे नसते. म्हणजे:
जर प्रेयसीला विरह जाणवत असेल्:
तर ती सर्व शेर विरहावर करेलही. पण त्यात 'अनप्रेडिक्टॅबिलिटी', 'काव्य असणे' ( म्हणजे सपाट बातमी किंवा विधान नसणे ), उपमा, भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी इतर उदाहरणे देणे वगैरे गोष्टी जाणीवपुर्वक येतील. खरे तर त्या नैसर्गीक पद्धतीनेच येतील. म्हणजे तेवढी तीव्रता मुळातच असेल.
वरील गीतात तसे नाही. विविध मार्गांनी एकच गोष्ट विचारली गेली आहे. अर्थात, ज्या कवीने पुढच्या अनेक कवींच्या पिढ्या निर्माण केल्या व स्वत:साठी मराठी काव्याच्या इतिहासात एक ध्रूवपद निर्माण केले त्या कवीवर काही भाष्य करणे हे माझ्या कुवतीबाहेरचेच आहे असे नाही तर मी ते कधी करू इच्छिणारही नाही. परंतू, जो सदर रचनेबद्दल विषय चालला आहे त्यावर माझे हे स्पष्ट मत आहे.
मान्य आहे
-
गझल म्हणजे फक्त तंत्र नव्हे!>> हे पुर्णपणे मान्य आहे. पण तंत्र नसेल तर ती गझल नाही हे ही तितकेच खरे आहे.
नव्याने गझल लिहू इच्छीणार्या माझ्यासारख्या लोकांना प्रथम गझलेचे तंत्र आत्मसात करून त्यावर पकड मिळवणे आवश्यक आहे. ती पहिली पायरी आहे असे मला वाटते.
बाकी गझलेचा मंत्र अभ्यास करून आत्मसात करता येइल का? की ती एक दैवी देणगी आहे हे प्रश्न आहेतच. बाराखडीत भटांनी गझल व कवितेमधले मंत्राच्या दृष्टीने काही ठळक फरक दिले आहेत. सुरुवातीला निदान ते फरक रचनेत दिसतात का हे पाहणे ही दुसरी पायरी. मग पुढे जाऊन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'अनप्रेडिक्टॅबिलिटी', 'काव्य असणे' ( म्हणजे सपाट बातमी किंवा विधान नसणे ), उपमा, भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी इतर उदाहरणे देणे, आशयाचा अंदाज काफिया येईपर्यंत बांधता न येणे हे सगळे येईल असे मला वाटते.
- नचिकेत आठवले
अगदी खरे आहे.
श्री नचिकेतसाहेब,
आपले म्हणणे अगदी खरे आहे. मुळात तंत्र नसेल तर ते काव्य गझल होणारच नाही.
एक द्विपदी दुसर्या द्विपदीवर आशयासाठी विसंबून नसणे हे गझलेच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जे गझलेला कवितेपासून वेगळे करण्यात एक महत्वाचा वाटा उचलते.
गझलमंत्र - ही गोष्ट अभ्यास करण्याची खरे तर नाहीच असे माझे तरी मत आहे. तसे असते तर बरेच कवी तंत्र व मंत्र शिकून गझलकार होऊ शकले असते. ( थोडा मीही तसाच आहे. हा हा.) गझलेच्या शेराचा आशय मनात निर्माण होणे ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे.
उदाहरण - निसर्गरम्य द्रुश्य पाहून एखाद्याला त्या निसर्गाच्या वर्णनाचीच कविता करावीशी वाटू शकेल. पण एखाद्या गझलकाराला ती रम्यता क्षणिक आहे असे वाटणे / प्रेयसी भेटल्यावर होणार्या मनस्थितीसारखी आहे असे वाटणे / जगाच्या फसव्या प्रव्रुत्तीसारखी आहे असे वाटणे / ती रम्यता निर्माण होण्याआधी निसर्गात काय काय घडले होते याची जाण येणे ( काय त्याग केल्यावर काय लाभते वगैरे ) / जुना जमाना कसा होता याची आठवण येणे यातील काहीतरी होईल. भटसाहेबांचा एक शेर 'गझल' व 'कविता' यांच्यातील निर्मीतीमागची प्रक्रिया कशी भिन्न असते हे दाखवण्यासाठी उत्तम आहे:
यौवनात पदार्पण करणार्या प्रेयसीला पाहून कवी देहभान विसरला व जगात काय चालले आहे त्याबाबतीत पूर्णपणे अजाण राहिला.
फुलायला लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते
आता हा शेर गझलेचा का म्हणायचा? -
1. तो रचनेतील इतर द्विपदींवर आशयासाठी अवलंबून नाही.
2. तो गझलेचे तंत्र पाळतो. ( खरे तर हा मुद्दा क्रमांक एक पाहिजे. )
3. ते प्रेयसीच्या यौवनात पदार्पण करण्याचे सवंग वर्णन नाही. म्हणजे दुसर्या एखाद्या कवीने ती यौवनात येताना कशी फुलायला लागली याचे इथ्यंभूत वर्णन केले असते. पण या शेरात तिच्या त्या बदलांमुळे कवीवर काय परिणाम झाला याचे वर्णन आहे. म्हणजेच ही एक अनुभुती झाली. यात एका अनुभवाचे, एका घटनेचे वर्णन आहे. गझलेमधे अनुभुती व अनुभुतीचा सच्चेपणा ( किंवा परकायाप्रवेश ) अत्यंत महत्वाचा आहे. निसर्ग छान दिसत होता, ती फार सुंदर दिसते, राजकारणी नालायक आहेत वगैरे बातम्या आहेत. त्यातून कवीच्या मनस्थितीवर होणारा परिणाम कवीने मांडणे हा गझलेतील व कवितेतील अनेक फरकांमधील एक फरक आहे.
4. व्यथा - गझलेमधे व्यथेच्या उपस्थितीला बरेच महत्व असावे असे अनेक गझला वाचल्यावर जाणवावे. वरील शेरात कुठे व्यथा आहे असा प्रश्न कदाचित पडेलही! पण आहे! मी तुझ्यावर प्रेम करण्यात सारा वेळ घालवला, पण मला त्याचा काय फायदा झाला? उलट माझ्या बाबतीत किंवा नशिबात आलेले चांगले क्षण सुद्धा मी तुझ्यामुळे दुर्लक्षित ठेवले. अशी ती व्यथा!
5. एक ओळ दुसर्या ओळीच्या तुलनेत - गझलेमधील व कवितेतील आणखीन एक फरक असा म्हणायला हरकत नाही की गझलेमधील एका ओळीचा दुसर्या ओळीशी संबंध तर असतोच पण बहुतेकवेळा दुसर्या ओळीत पहिल्या ओळीला 'कलाटणी मिळणे', 'अचाट रीतीने अंत होणे' ,'तीव्रता अती वाढणे' यातील काहीही किंवा काहीतरी अधिक होते. कवितेमधे असे होतही असेल, पण व्हायलाच पाहिजे असे कवितेकडून अपेक्षित करता येत नाही. गझलेकडून मात्र काहीतरी जबरदस्त अपेक्षा ठेवली जाते. ( याबाबतीत मात्र सदर शेर कसा आहे हे मला ठरवता येत नाही. ) पण अर्थातच ही फक्त एक अपेक्षा आहे. ती एकच अपेक्षा नाहीये जी पूर्ण व्हायलाच पाहिजे.
आपल्या प्रतिसादाचा अभिलाषी!
सुंदर विवेचन्
भूषण साहेब,
फार चांगल्या रितीने मुद्दे मांडले आहेत तुम्ही. मला नसते जमले. :-)
एक द्विपदी दुसर्या द्विपदीवर आशयासाठी विसंबून नसणे हे गझलेच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. >> मला वाटते हा मुद्दा तंत्रासोबतच मंत्राचाही भाग असावा. लांबड न लावता दोन ओळीत पुर्ण आशय व्यक्त करण्यासाठी नुसते तंत्र अवगत असणे पुरेसे नसावे.
तुम्ही म्हणता तसा मुद्दा क्र. 5 ही फक्त अपेक्षा असते. मला वाटते सौंदर्य ही मुळ अपेक्षा आहे. कलाटणी, तीव्रता ह्या अंगामुळे शेराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. विशेषत: हे दोन ओळींत होत असल्याने गझलेमधे हे जास्त बघायला मिळत असावे असे वाटते. वैभव जोशी ह्यांच्या नेमस्त ह्या कवितेतील दोन ओळी आठवल्या:
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते..
कवितेच्या असल्या तरी ह्या ओळी वरील सर्व निकषांवर खर्या उतरू शकतात.
अजून एक मुद्दा म्हणजे प्रत्येक शेराचा वाचकाला लागणारा अर्थ. हा पुर्णत: वाचकांच्या अनुभवविश्वावर अवलंबून असतो. "फुलावया लागलीस..." ह्या शेरात तुम्ही यौवनात पदार्पण करणार्या प्रेयसीचा उल्लेख केला आहे. मला हा शेर भटांनी स्वत:च्या गझलेला उद्देशून लिहिला आहे असे नेहमीच वाटत आले आहे. (त्यांच्या इतर रचनांमधेही 'येणार्या पिढ्यां'बद्दल बरेच शेर आहेत.) फरक (प्रेयसी, गझल) फार सुक्ष्म असला तरी अर्थाचा एक वेगळा पैलू समोर येतो. व्यक्ति तितक्या प्रकृती हे जरी खरे असले तरीही माझ्या मते किमान एक अर्थ वाचकांपर्यंत पोहचत असेल तर तो यशस्वी शेर आहे. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे दुर्बोधता सापेक्ष असली तरी सुबोधता हा दुर्गुण होऊ शकत नाही. कदाचित म्हणूनच भटांनीसुद्धा "बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा" असे म्हटले असावे.
तुर्तास एवढेच.
- नचिकेत आठवले
सो व्हेरी करेक्ट..
श्री नचिकेत साहेब,
मला ते दोन् विशिष्ट विचार कायम ठासावासे वाटतात व आवडतातही. आपणही नेमका तेच मांडलेत.
( एकंदर आपले जमेल असे वाटत आहे. )
1) दुर्बोधता सापेक्ष असली तरी सुबोधता हा दुर्गूण नाही.
2) निदान एक अर्थ तरी रसिका/वाचका/श्रोत्यापर्यंत पोचलाच पाहिजे. बाकी त्यांच्या अनुभवविश्वानुसार ते काढतील तो अर्थ निराळाच!
मला तर असेही म्हणावेसे वाटते की 'जो एक अर्थ रसिकापर्यंत पोचलाच पाहिजे' तो अर्थ कवीला 'अभिप्रेत असलेला' अर्थही असावा. म्हणजे मला जे म्हणायचे आहे ते तसेच मुळात वाटू शकणे, शब्दार्थ एक अन भावार्थ वेगळा असणे हे रसिकाने जाणू शकणे व रसिकाला हवा तो एक नवीन अर्थही निघणे हे यशस्वी कवितेचे एक चिन्ह म्हणायला हरकत नसावी.
उदाहरणार्थ -
वैभव जोशी यांचाच एक मला अतिशय आवडलेला शेर देत आहे:
असे लांबून बघण्याने खरी ओळख कुठे पटते?
उद्या माझ्या ठिकाणी वेगळा तारा असू शकतो
वैभव यांना काय अभिप्रेत असावे असा अंदाजही रसिकाला येऊ शकतो तसेच आपापल्या अनुभवविश्वाप्रमाणे रसिकाला एक स्वत:चा असा वेगळा अर्थही प्राप्त करून घेता येतो.
गझलेचे शेर असे सार्वकालीन व सर्वसमावेशक असले की फार मजा येते.
( उघड आहे: वरील शेर कुठल्याही काळातील माणसाला स्वत:ला आयडेंटिफाय करणारा वाटणे सहज शक्य आहे. )
आपल्याशी चर्चा करताना मजा येत आहे.
Musalsil ghazal?
सर्व शेरात बेसिकली एकच प्रश्न किंवा मुद्दा आहे.- This is right.
How about calling this a musalsil ghazal?
Majority of the ghazals written in urdu are ghair-musalsil. Therefore, it is believed that a ghazal has to be ghair-musalsil and every sher must be independent of the other and usually having a different theme and thought. I personally feel that it is indeed the speciality of ghazal and adds to its beauty. However, if a ghazal has common theme in all the shers but is following the grammatical laws of ghazal, why not call it a musalsil ghazal rather than nazm?
Will appreciate confirmation/ comments from pundits here.
Dhananjay