किती आवश्यक?

प्रतिसाद

वृत्त किती आवश्यक?

वृत्तामध्ये लिहीण्याचा सुरेशजींनीही पुरस्कार केला आहे. पण वृत्तामधे लिहीताना गझलेची लिंक तुटते. कार्यशाळेमध्ये काही गझला तशा आहेत. हे, च, अन असे शब्द वापरले जातात. वृत्तात चांगली गझल लिहीण्यासाठी काय करावे?

चक्रपाणि's picture

लिंक तुटणे

गझलेची लिंक तुटणे यामधून तुमचा निर्देश यतिभंगाकडे असेल, तर ही समस्या चपखल शब्द वापरून सोडवता येते, असे मला वाटते. हा, च, अन असे शब्द भरीचे वाटत नसतील, तर वापरण्यास काहीच हरकत नसावी. 'तो मी नव्हे' आणि 'तो मी नव्हेच' यांपैकी ठामपणा कशात दिसतो? 'ते माझे आहे' आणि 'ते माझेच आहे' यापैकी पझेसिव्हनेस कशातून प्रकट होतो? अशा भावना 'च' वगैरे न वापरता पूर्णपणे प्रकट/व्यक्त होत नसतील, तर मग असे 'च' वगैरे का वापरू नयेत? :)

लिंक

वृत्तामध्ये गझल लिहीता येणे ही पहिली अन महत्त्वाची पायरी . खरतर वृत्त नसेल तर तिला कविताच म्हणायला हवे , गझल म्हणताच येणार नाही. राहता राहिला तो विषय भरीच्या अक्षरांचा व शब्दांचा . हे त्या त्या रचनेवर अवलंबून आहे. चक्रपाणिने म्हट्ल्याप्रमाणे जोर द्यायचाच असेल तर च येणे गरजेचे आहे. पण आपला प्रश्न तसा नसावा. आपण वाचलेल्या रचनेत आपल्याला ते शब्द, ती अक्षरे भरीची वाटली असावीत. तर मला वाटतं सततच्या वाचनाने आणि लिखाणानेच हा दोष जाऊ शकतो. बर्‍याचवेळा उत्स्फूर्त कविता लिहून झाली की सहसा तिच्याकडे पुन्हा वळून न पाहण्याची प्रवृत्ती कवीची असते. आणि ते योग्यच आहे कारण त्याला नवी क्षितिजे खुणावत असतात. परंतू कुठलीही कलाकृती आपल्या हातून उतरते तो क्षण थोडासा लांबवावा आणि मागे रेलून एकदा का होईना त्यावर निस्पृहपणे विचार करावा असे माझे मत. आपण ज्यांना रफ एजेस म्हणतो त्या ह्या एका क्षणात दिसून येतात.

धन्यवाद

बरोबर आहे. मी प्रयत्न करेन..:-)

AbhayChitnis's picture

व्रुत्ताविषयी

कवितेला एक लय यामुळे लाभते