या गीतांना गझल म्हणता येईल का?

या गीतांना गझल म्हणता येईल का?

१. केंव्हा तरी पहाटे - सुरेश भट
२.तरुण आहे रात्र अजुनि - सुरेश भट
३.भोगले जे दुःख तयाला - सुरेश भट
४. काटा रुते कुणाला - शांता शेळके
५.मेंदीच्या पानावर - सुरेश भट
६.सखी मंद झाल्या तारका - सुधीर मोघे
७.अशी पाख्ररे येती - मंगेश पाडगांवकर

कृपया स्पष्टीकरण द्यावे ही विनंती.

प्रतिसाद

माझ्या मते

'केव्हातरी पहाटे, तरुण आहे रात्र अजुनी' आणि 'भोगले जे दुःख' ह्या गझलाच आहेत. कारण प्रत्येक द्विपदी स्वतंत्र आणि सार्वभौम आहेत. 'मेंदीच्या पानावर' ह्या कवितेची शीर्षक 'माहेरवाशीण' आहे. ती गझल नाही. 'काटा रुते कुणाला', 'सखी मंद झाल्या तारका' आणि 'अशी पाखरे येती' ह्या गझला नाहीत.

सहमत

चित्तसाहेबांशी सहमत...

समजले

समजले.मग -
भटसाहेबांचे "आज मी जे गीत गातो" हे गीत गझल आहे का?
उत्तराबद्दल धन्यवाद.

नाही

नाही.:)

नचिकेत जोग's picture

तरीही...

गझलेला व्याकरण असते, पण माझ्यामते दोन ओळित मनात घुसते
ती प्रत्येक कविता गझलच.
थोडक्यात, उहापोह नको, आस्वाद घ्या.